बिलावल यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताविरुद्ध जो पवित्रा घेतला तो अचानक असण्याची शक्यता नाही. त्याचे परिणाम काय याची कल्पना बिलावल यांना किंवा ते प्रतिनिधित्व करत असलेल्या पाकिस्तानच्या सरकारला नाही ही शक्यताच नव्हती. शेजारच्या देशाच्या पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर हल्ला केल्यानंतर उभय देशांत संबंध ताणले जाणार हे स्पष्टच आहे.