कोण्या एका जंगलात मदोत्कट नावाचा एक सिंह राहात होता. गेंडा, कावळा आणि गिधाड त्याचे सेवक होते. एक दिवस त्यांना जगला इकडेतिकडे फिरणारा आपल्या तांड्यापासून भरकटलेला क्रथनक नावाचा एक उंट दिसला. उंटाला पाहून सिंह म्हणाला, "वा! हा तर खूपच सुंदर प्राणी आहे. माहिती काढा हा पाळीव आहे की जंगली." हे ऐकल्यावर कावळा म्हणाला, "स्वामी उंट नावाचा हा पाळीव प्राणी तुमचं भोजन आहे. तुम्ही लगेच त्याला ठार मारा." सिंह म्हणाला, "नाही. मी माझ्या घरी आलेल्याला नाही मारणारा. तुम्ही त्याला अभयदान द्या आणि माझ्याकडे घेऊन या. जेणेकरून मी त्याला इथे येण्याचं कारण विचारू शकेन."
सिंहाचं म्हणणं मान्य करून त्याच्या साथीदारांनी उंटाला कसंबसं विश्वासात घेतलं आणि ते त्याला मदोत्कटाकडे घेऊन आले. तेव्हा सिंहाने विचारल्यावर त्या उंटाने स्वतःविषयी सार काही सांगून टाकलं की कशा प्रकारे गावात तो आपल्या मालकासाठी ओझी उचलायचा आणि आज कशा प्रकारे आज त्याची आणि त्याच्या साथीदारांची चुकामुक होऊन तो इथे जंगलात पोचला, हे सगळं त्याने सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून सिंह म्हणाला, "क्रथनक भाऊ, आता तुम्हाला गावी परत जाऊन पुन्हा ओझी उचलण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही आता इथेच आमच्याबरोबर या जंगलात रहा आणि अजिबात न घाबरता हिरव्या लुसलुशीत गवताचा आनंद घ्या.
तेव्हापासून मदोत्कटाच्या संरक्षणात तो हत्ती एकदम निडर होऊन जंगलात राहू लागला
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices


