आषाढी वारीच्या मुहूर्तावर लाखो पावलं पुन्हा पंढरीच्या वाटेला लागली आहेत. असंख्य वारकरी, ७०० वर्षांची अखंड परंपरा — आणि आजवर एकही चेंगराचेंगरीची घटना नाही. कोणतीही केंद्रीय यंत्रणा नसताना हे घडतं तरी कसं? पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक यात्रा नव्हे — ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. "जिथं वारकरी, तिथपर्यंत महाराष्ट्र" असं रंगनाथ पठारे का म्हणतात? पालखीची परंपरा तुकोबांनी नव्हे, तर त्यांच्या पुत्रांनी सुरू केली हे किती जणांना ठाऊक आहे? ज्ञानोबा-तुकोबांच्याही आधीपासून वारी चालत आली आहे, नामदेवांचे तब्बल ४० अभंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबात विराजमान आहेत — आणि जगाला व्यवस्थापनाचे धडे देणारे मुंबईचे डबेवाले मुळात वारकरीच आहेत! या वारी विशेष भागात संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. रूपाली शिंदे वारीचं अंतरंग उलगडले आहे — ज्ञानेश्वर माऊलींनी घातलेला तत्त्वज्ञानाचा पाया, नामदेवांनी उभी केलेली कीर्तन-अभंगांची प्रसारयंत्रणा, विठ्ठल म्हणजे नेमका कोण या वादाचं अभ्यासपूर्ण उत्तर, आणि हैबतबाबा आरफळकरांनी वारीला लावलेली अशी शिस्त, जी आजही जशीच्या तशी चालते आहे.


