सतत धावणाऱ्या, अहोरात्र जागणाऱ्या, आणि सतत काही ना काही घडणाऱ्या मुंबईत दोन नावं घेतली, की आजही लोक क्षणभर थबकतात. जुन्या पिढीतल्या लोकांना सगळे संदर्भ आठवतात, आणि नव्या पिढीची उत्कंठा आणखी वाढत जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दाऊद इब्राहिम या दोन ध्रुवांवरच्या दोन माणसांनी त्यावेळी मुंबई व्यापली. तो काळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातही धडकी भरवणारा तुफान वादळी ठरला