इतिहासात फुले दांपत्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरूषांनी स्त्री उद्धाराच्या कार्याची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतून केली. आधुनिक काळातही महाराष्ट्रानेच ही परंपरा पुढेही चालू ठेवली. महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया महाराष्ट्रातच रचला गेला. 'चूल आणि मूल' हा वाक्प्रचार ज्याने कोणी तयार केला असेल त्याच्या विचारांना महाराष्ट्रानं आणि इथल्या महिलांनी पहिल्यांदा सणसणीत चपराक दिली. राजकारणापासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात महिलांच्या सहभागाची प्रक्रिया आता नॉर्मलाईज झालीय. पण या प्रक्रियेच्या मुळाशी महाराष्ट्र आहे हे अभिमानाने सांगायला हवं.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, International Women's Day, Women’s Reservation, women’s politics


