गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये तीन दशकांपूर्वी पडलेल्या वादाची ठिणगी आजही शमलेली नाही. प्रस्थापितांची गढी रोखण्यापासून ते थेट आव्हान देण्यापर्यंतचा हा थरार आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. एकाच पक्षात असूनही त्यांच्यातील कोल्ड वॉर संपलेले नाही. त्यांच्या भुतकाळातील संघर्षांचे मूळ निवडणुकीतील टक्कर आणि राजकीय वर्चस्वात आहे, ज्यामुळे हे वारंवार चर्चेत राहिले आहेत. या टोकाच्या संघर्षाची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली? पाहुया आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये...


