1970 च्या दशकानं प्रचंड रातकीय उलथापालथ पाहिली…..गुजरातचं आणि त्यानंतरचं बिहारमधलं विद्यार्थ्यांचं आंदोलन….देशाच्या राजकीय पटलावरचा जयप्रकाश नारायण नावाच्या झंझावाताचा प्रवेश..इंदिरा गांधींनी लादलेली अंतर्गत आणिबाणी…. त्यानंतर झालेला जनता पक्षाचा उदय आणि अस्त आणि आज देशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचा जन्म अशा प्रचंड राजकीय घडामोडी या कालखंडानं पाहिल्या…..