विधीमंडळाचे अधिवेशन म्हणजे कोणत्याही सरकारची कसोटीच. त्यातही काठावरील बहुमत असलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्याला तर डोळ्यात तेल ठेवूनच कारभार करावा लागतो हे देखिल सत्य.....साहजिकच अशा सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्ष सतत प्रयत्न करतात.....विरोधकांच्या अशा खेळ्यांना अनेकदा सामोरे गेले होते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख.... ही गोष्ट आहे १९९९ची.