बाळासाहेबांच्या विचारधारेबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र बाळासाहेबांनी सत्तेची गंगा सामान्यांच्या दारात पोहोचवली, हे कुणीही नाकारू शकत नाही. काँग्रेसच्या सरंजमी वृत्तीच्या नेत्यांसमोर सामान्यांचे काहीएक चालत नसतानाच्या काळात बाळासाहेबांनी अगदी सामान्यांतील सामान्य लोकांना सत्तेची पदं दिली. त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री बनवले