केंद्र सरकार देशात तुरीचे दर कमी असो वा जास्त आयात करतच असते. भारताचा मुख्य तूर पुरवठार देश अशी म्यानमारची ओळख होती. मात्र मागील पाच वर्षांमध्ये म्यानमारमधील तूर उत्पादन आणि निर्यात कमी होत गेली. तर आफ्रिकेतील टंझानिया, मोझांबिक आणि मालावी देशातील उत्पादन आणि भारताला होणारी निर्यात वाढली. पण भारतावर तूर आयात करण्याची वेळ का येते? आफ्रिकेतून तूर आयातीचं प्रमाण का वाढलं? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.


