पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार समिती नेमणार आहे. अग्रीमसह नुकसानभरपाईचे वेगवेगळे ट्रिगर लागू होण्याच्या नियमात बदल करणे आवश्यक आहे. तसेच नुकसान भरपाई ठरवताना उंबरठा उत्पादन, सदोष पंचनामे, भरपाईत मिळण्यात होणार उशीर टाळावे तसेच अंतिम तोडगा राज्य पातळीवर निघावा, असे बदल शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी सुचविले आहेत.


