यंदा जिरा पिकाला बदलते हवामान आणि अतिथंडीचा फटका बसत आहे. त्यामुळं यंदा देशातील जिरा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यातच जिऱ्याला पुढील काळात निर्यातीसाठी आणि देशात लग्नसराईमुळं उठाव मिळेल. मागील हंगामातील साठाही कमी प्रमाणात शिल्लक आहे. मग या स्थितीत जिऱ्याचे भाव काय राहू शकतात? जिरा यंदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


