सरकारने यंदा देशात १३६ लाख टन, म्हणजेच विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. तर सरकारने आतापर्यंत २१ लाख ६५ हजार टनांची हमीभावाने खरेदी केली. यंदा हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये हमीभाव आहे. पण असं अतानाही खुल्या बाजारात हरभरा दबावातच आहे. माग सरकारची खरेदी वाढूनही भाव दबावातच का आहेत? खरेदी वाढविण्यामागे सरकारचा मनसुबा काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


