देशात अनेक भागात हरभरा काढणी सुरु झाली. पण वाढलेल्या उष्णतेचा हरभरा पिकाला फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हरभरा उत्पादकता कमी राहिल्याचे स्पष्ट होत आहे. मग याचा बाजारावर परिणाम जाणवत आहे का? यंदा हरभरा बाजारभाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


