शेतीचे भोग संपण्याची सध्या कुठलीच चिन्हं दिसत नाहीत. उलट यापेक्षा अधिक वाईट दिवस येतील, असाच सध्याचा रागरंग आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी माझी 'आनंददायी शेती' ची कल्पना अंमलात आणण्याची गरज आहे. ही शेती आपलं जगणं आनंददायी, आरोग्यदायी करू शकते, हा माझा अनुभव आहे.