काही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात चीन भारतावर सायबर हल्ला केल्याच्या बातम्या आपण वाचल्या. हल्ले वरचेवर होत असतात. असंही म्हटलं जातं यापुढची युद्ध ही सायबर स्पेसमध्येच खेळली जातील. सायबर हल्ला म्हणजे नेमकं काय? सायबर वॉर काय असतं? सायबर वॉर होऊ नये म्हणून युजर्सनी काय काळजी घ्यायला हवी हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या पॉडकास्टमध्ये विशेष गप्पा मारल्या आहेत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्याशी.


