मराठीतला बायोपिक स्टार अशी ओळख जर सुबोध भावेची करुन दिली तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. 'बालगंधर्व','लोकमान्य','डॉ.काशिनाथ घाणेकर' असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे करुन सुबोधनं महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वांना अक्षरशः जिवंत करुन पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला धन्य केलं. मालिका,सिनेमा,नाटक,आणि आता ओटीटी प्लॅटफॉरमवरही रुळलेला सुबोध सध्या चर्चेत आहे ते 'बस बाई बस' कार्यक्रमाचं निवेदन करत असल्यानं. या निमित्तानं सुबोध भावेनं सकाळ Unplugged या आमच्या पॉडकास्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला आहे.


