मराठी चित्रपट विश्वात टीडीएमच्या वाट्याला जे आलं त्यावरुन मराठी चित्रपटांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय हे दिसून आलं. टीडीएमचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी रडून आपल्या चित्रपटाला स्क्रिन्स मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. यासगळ्यात त्यांनी मराठी प्रेक्षक आणि मराठी माणूस हा मराठी प्रेक्षकांच्या बाजुनं उभा राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळच्या सकाळच्या अनप्लग पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडेंनी मराठी इंडस्ट्रीत काय सुरु आहे याविषयी परखडपणे आपली बाजू मांडली आहे.


