'लाडाची मी लेक गं ', 'बिग बॉस' यांसारख्या दर्जेदार मालिकांमधून घराघरात पोहोचलेला आणि 'रेगे', 'फनरल' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा अभिनेता आरोह वेलणकर सध्या भलताच चर्चेत आहे. आरोह सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. त्याच्या राजकीय भूमिका या अत्यंत सडेतोड असतात, बऱ्याचदा त्यावरून ट्रोलिंगचाही सामना त्याला करावा लागला आहे. सध्या राजकीय गदारोळातही आरोह आले विचार निर्भीडपणे मांडतो आहे. नुकतीच त्याने महाविकास आघाडीची वेळ संपत आली आहे असे भाष्य केले होते. त्या निमित्ताने आरोह वेलणकरशी sakal unplugged मध्ये संवाद साधण्यात आला. यावेळी त्याने कलाविश्वासोबत आपल्या राजकीय भूमिकांवरही प्रकाश टाकला भाष्य केले.


