सिनेमा,नाटक,मालिकांमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशाच कलाकृतीतनं तिनं काम केलं. कारण पूर्वीच्या मालिकांमधनं दाखवली जाणारी पुरुषप्रधान संस्कृती तिला पटायची नाही, दागिने घालून स्वयंपाकघरात राबणारी स्त्री तिला रुचायची नाही म्हणून मालिकांपासनं लांब राहणं तिनं पसंद केलं. पण आता 'आई कुठे काय करते' मालिकेत 'अरुंधती' साकारल्यानंतर मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून ती म्हणाली,''चुकलंच माझं. मी खूप काही मिस केलं''. मधुराणीसोबतचा हा मनमोकळा संवाद ऐका 'सकाळ unplugged' कार्यक्रमात.


