पश्चिम बंगालमध्ये तब्बल 34 वर्षे डाव्या आघाडीची सत्ता अबाधित होती. शेतकरी धोरणांमुळे निर्माण झालेला भक्कम जनाधार हा त्यांच्या यशाचा मुख्य आधार होता. मात्र 2000 नंतर औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहणाच्या निर्णयांनी परिस्थिती बदलली. सिंगूर, नंदीग्राम आणि लालगड या आंदोलनांनी राज्यात मोठा असंतोष निर्माण केला. ममता बॅनर्जी यांनी या असंतोषाला राजकीय रूप देत स्वतःला सामान्य जनतेचा आवाज म्हणून उभं केलं. “माँ, माटी, मानुष” या घोषणेद्वारे त्यांनी जनतेशी भावनिक नातं निर्माण केलं. अखेर 2011 मध्ये डाव्यांची सत्ता संपुष्टात येत बंगालमध्ये मोठा राजकीय परिवर्तन घडून आलं.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, West Bengal Politics, Mamata Banerjee, Left Front Rule, Singur Movement, Nandigram Protest, Lalgarh Movement, Bengal Political Change, Land Acquisition Issue, Trinamool Congress, Maa Mati Manush


