निवडणूका जिंकताना अंकगणित जमावं लागतं. तसंच लोकाना आवडेल असा कार्यक्रम, जातधर्माची गणितं आणि नेतृत्वाची मतदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता, अशा अनेक बाबी लागतात. आता एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्या पुढं येत असताना अंकगणित आणि वैचारिक लढाईतील रणरेषा ठरवण्याचा प्रयत्न सध्या स्पष्ट दिसतोय. सध्याचा काळ पाहता पुन्हा एकदा आगामी काळात आघाड्यांना महत्त्व येणार आहे असं चित्र आहे