बाजीराव-मस्तानीच्या नात्याकडे आपण आजवर केवळ एकाच नजरेतून पाहिले. पण या प्रकरणामागे एक मोठे राजकीय षडयंत्र दडलेले होते. त्या षडयंत्राचा सुत्रधार कोण ? चिमाजी अप्पा, राधाबाई आणि नानासाहेब यांची भूमिका काय होती? काही इतिहासकारांनी आणि लेखकांनी बाजीरावांवर मस्तानीमुळे कर्तव्य विसरल्याचा आरोप केला, मस्तानीचे आणि सोबत बाजीरावांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, पण खरा इतिहास काय सांगतो? ऐतिहासिक कागदपत्रे काय सांगतात? काय पहाल या एपिसोडमध्ये : मस्तानी खरोखरच बाजीरावांच्या वाईट सवयींना कारणीभूत होती की हा केवळ एक बनाव होता? बाजीरावांचे काशीबाईंवरील प्रेम कमी झाले होते का? पुरावे काय सांगतात? समशेर बहादूरची मुंज करावी अशी बाजीरावांची इच्छा होती ? मस्तानीला विरोधाची परिवारिक कारणे काय ? पेशवे / भट कुटुंब कशाला घाबरत होते? त्यावेळचा ब्राह्मण समाज बाजीरावांच्या विरोधात होता का ? काका विधाते यांनी मांडलेला हा इतिहास या एपिसोड मध्ये जरूर बघा कारण चित्रपटातील काल्पनिक पटकथा म्हणजे खरा इतिहास नव्हे ! थोरले बाजीराव पेशवे या सेरीज मधला हा शेवटचा एपिसोड आणि मराठेशाहीच्या इतिहासातील महत्वाचा भाग प्रत्येक मराठी माणसाला माहीत हवा.


