परकीय आक्रमणे आणि मराठ्यांचा भीमटोला: जेव्हा इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा भारतावर चालून आला, तेव्हा दिल्ली रक्ताने माखली होती. अवघ्या तीन तासांत ३० हजार निष्पाप लोकांची कत्तल आणि मयूर सिंहासनासह कोट्यवधींची लूट घेऊन जाणारा हा 'मौत का सौदागर' नेमका कोण होता? नादिरशहाच्या या आक्रमणामागे निजामाची आणि सादत खानाची फितुरी कशी होती, याचा पर्दाफाश या भागात करण्यात आला आहे. अशा कठीण काळात, जेव्हा मुघल साम्राज्य कोसळत होते, तेव्हा संपूर्ण हिंदुस्तानाची आशा केवळ बाजीराव पेशव्यांवर होती. सैन्य वसईत गुंतलेले असतानाही, बाजीरावांनी केवळ आपल्या नावाने नादिरशहाला रोखण्याचे 'धैर्य' कसे दाखवले? "परराज्य राहिले तरी सर्वांवरी आहे," ही बाजीरावांची राष्ट्रवादी भूमिका आणि त्यांनी नर्मदा-चंबळच्या पलिकडे शत्रूला रोखण्यासाठी आखलेली रणनीती श्री. काका विधाते यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत मांडली आहे. भारताच्या इतिहासातील हा थरारक कालखंड समजून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका.


