तब्बल ७० वर्षे, अरबांची १४ आक्रमणे, या हिंदुशाही राजवटीने - सिंधने परतवून लावली. अवघ्या १७ वर्षांचा मोहम्मद बिन कासिम, ज्याने भारतावर १५ वे यशस्वी आक्रमण घडवून आणले, तेंव्हा हिंदू राजा दाहिर तिथे राज्य करत होता. असे काय घडले की ७११ मधील १५ व्या आक्रमणात भारताचे सिंध हे अभेद्य प्रवेशद्वार कोलमडले? या संपूर्ण युद्धाचा टर्निंग पॉईंट काय होता? जिंकत आलेली लढाई एका क्षणात पराभवात कशी बदलली? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या विशेष भागात, ज्येष्ठ कादंबरीकार श्री. काका विधाते यांच्या 'दास्तां-ए-दाहीर' या ऐतिहासिक कादंबरीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सिंधचे अंतिम हिंदू राजे —राजा दाहीर यांचा दैदिप्यमान इतिहास! काय पहाल या भागात.. ? • सिंधची एकाकी झुंज: मध्यवर्ती सत्ता बळकट नसल्यामुळे भारताचे प्रवेशद्वार असणारा सिंध प्रांत परकीय आक्रमणा वेळी कसा एकाकी पडला? • अरबांनी लिहून ठेवलेल्या 'चाचनामा' ग्रंथाच्या आधारे उघड होणारा सिंध राज्याचा इतिहास. • अरबांचा तत्कालीन इतिहास, मुस्लिम धर्म आणि त्यांची तलवार याचा संबंध काय ? • अंतर्गत कलहाचा शाप: सिंध प्रांतात बौद्ध धर्मीय प्रजा आणि ब्राह्मण राजे यांच्यातील अंतर्गत दुराव्याचा फायदा परकीय आक्रमकांनी कसा घेतला? * राजा दाहिर याला हिंदुस्तान आणि आपण का विसरलो ? हा अस्सल, रक्तरंजित इतिहास ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मातीसाठी बलिदान देणाऱ्या या 'अनसंग हिरो' आणि त्याच्या संपूर्ण परिवाराची शौर्यगाथा प्रेरणादायी आहे.


