आझादी UNPLUGGED : "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणणारे स्वामी समर्थ महाराज नेमके कुणाच्या पाठीशी असतात?

आझादी UNPLUGGED : "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणणारे स्वामी समर्थ महाराज नेमके कुणाच्या पाठीशी असतात?

 स्वामी समर्थ महाराजांचा भक्त संप्रदाय आज जगभर पसरलाय. स्वामी समर्थ महाराजांनी केवळ चमत्कार नाही केले तर भक्तांना प्रचिती दिली. ती प्रचिती आजही येत आहे म्हणूनच लाखो लोकांच्या मुखात स्वामींचे नाव आहे. स्वामींचा काळ तसा इंग्रजांच्या अगदी नजिकचा. त्यामुळे इंग्रजांनीही स्वामींपुढे हात जोडल्याचे दाखले आहेत. स्वामींची प्रचिती म्हणजे नेमकं काय, त्यांचं देशकार्यातील योगदान काय? हेच जाणून घेऊया, सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged" मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..