शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं खरं. पण आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने थेट एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यावरच दावा ठोकल्याच्या चर्चा रंगल्यात. गेल्या काही काळात समोर आलेल्या भाजप नेत्यांच्या विधानाने ठाणे आणि कल्याण मतदारसंघातली चुरस वाढली आहे. नेमकं यामागचं राजकारण काय आहे? शिंदेंच्याच ठाण्यावर भाजप दावा ठोकणार आहे का? तेच आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.


