महाराष्ट्रात श्रेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख होती.. त्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पण नाव बदलण्याचमागचं नेमकं कारण काय? अहमदनगरआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचंही नाव बदलण्यात आलंय. त्यामागचं राजकारण आणि नेमका हेतू काय, याचा आढावा घेऊयात आज स्पेशलच्या आजच्या पॉडकास्टमधून...


