देशातील बाजारात रब्बी हंगामातील कांदा आवक वाढत आहे. पण कांद्याला पावसाचा फटका बसत आहे. देशभरातील कांदा उत्पादक पट्ट्यात पाऊस पडत आहे. ऐन कांदा काढणीच्या काळात पाऊस दणका देत असल्याने कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय. कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचा फटका दराला बसतो. मग सध्या कांद्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कांद्याचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.


