दर दहा वर्षांनी इंजिनिअरिंग कॉलेजची फी दुप्पट होते. दरवर्षी लाखो पदवीधर बाहेर पडतात, पण नोकरी मिळते जेमतेम निम्म्यांना. इंजिनिअर झालेल्यांपैकी दहा टक्क्यांहूनही कमी मुलं नोकरीसाठी सक्षम मानली जातात. मग जेन झी रस्त्यावर उतरली, याचं आश्चर्य वाटायला नको. ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी यांच्याशी झालेली ही सविस्तर बातचीत. निमित्त — त्यांचं नवं पुस्तक 'सत्योत्तर जगाची खबरबात'. सुरुवात झाली NEET पेपरफुटीपासून, आणि गप्पा येऊन थांबल्या अशा एका मुद्द्यावर ज्यावर फारसं कुणी बोलत नाही — "सार्वजनिक प्रश्नांवर आपण खाजगी उत्तरं का शोधतो..?" सरकारी शाळेचा दर्जा घसरला? मुलाला खाजगी शाळेत घाला. बस वेळेवर येत नाही? स्वतःची गाडी घ्या. महापालिकेचं पाणी येत नाही? टँकर मागवा. कमावलेल्या शंभर रुपयांतले चाळीस रुपये नेमक्या याच तीन गोष्टींवर खर्च होतात — ज्या मुळात सरकारने करायच्या होत्या. अजून काय पाहाल या भागात? गुणवत्तेचं मिथक, सत्योत्तर जग (post-truth) म्हणजे नेमकं काय · वाजपेयींनी २००० साली संशोधनासाठी दिलेलं वचन काय होते, जे सव्वीस वर्षांनंतरही अपूर्ण आहे · आणि AI मुळे आपली प्रतिभा खरंच धोक्यात आहे का? श्रीधर लोणी यांनी लिहीलेल्या "सत्योत्तर जगाची खबरबात" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/satyottar-jagachi-khabarbat


