३ ऑगस्ट १९९७ ला डोंबिवलीचा निलेश कुलकर्णी कसोटी क्रिकेटमधील पहिल्या चेंडूवर बळी घेण्याचा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. टेस्ट क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा जरी निलेश अजूनही एकमेव गोलंदाज आहे, तरी त्या सामन्याचे उर्वरित तीन दिवस श्रीलंकेच्या फलंदाजानी उभारलेल्या धावांच्या डोंगरासाठी लक्षात राहतात. परंतु निलेशला बोलिंग योगायोगाने मिळाली त्या दिवशी हे तुम्हाला माहित आहे? आणि का आहे मारवान अटापट्टू, ज्याची विकेट निलेशने घेतली, निलेशवर अजूनही खट्टू? 'त्या' पराक्रमाच्या निमित्ताने जाऊया निलेशबरोबर आठवणींच्या गावा.