लोकसभेच्या निवडणुकांआधी विधानसभेच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुकांनी त्याची नांदी झाली. मात्र, देशाच्या राजकारणावर प्रभाव पडेल असं निवडणुकांना सामोरं जाणारं पहिलं राज्य कर्नाटक हे आहे. तिथली निवडणूक जाहीर झाल्यानं राष्ट्रीय राजकारणातील स्पर्धेला उधाण येईल.