बलात्काराबाबतच्या कायद्यात आज अनेक कडक तरतुदी आहेत...या तरतूदी सहजासहजी केल्या गेलेल्या नाहीत...या तरतुदी बदलण्यात कारणीभूत ठरली ती एक अनाथ आदिवासी मुलगी...या मुलीसाठी देशभर छेडल्या गेलेल्या लढ्याची दखल राज्यकर्त्यांना आणि न्यायालयांना घ्यावी लागली आणि त्यातून बलात्कार कायद्यातले बदल अंमलात आले...